मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसनारा हा नावाप्रमाने बलवान असनारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्णाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहुबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.
उत्तर कोकनतील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बदरान वर नजर ठेवण्यास असावा. किल्लावारील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बो॓ध्द् कालाशी जोडता येतो त्यांच्यावरील मनूष्य निमि॔त गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकत्यां॔नी त्याला लष्करी चो॓की बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.
नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्त्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरुन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करुन आपल्या संयुत्क फो॓जा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे पळ काढुन कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले. नंतर कोकणात जंजिर्या सिध्दिकडे गेले असता त्याने आष्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली, त्यावेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे ह्याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पूढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानूसार मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोदला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावनीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुभ्रिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार ईमारतींनचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.